Showing posts with label Linguistic Equality. Show all posts
Showing posts with label Linguistic Equality. Show all posts

Thursday, January 25, 2018

हिंदीविषयी असलेले गैरसमज

हिंदीबाबत आपल्याकडे अनेक चुकीच्या गोष्टी पसरलेल्या आणि रूढ झालेल्या आहेत.
पाहिलं म्हणजे आजच्या काळात हिंदी भाषा हि बरेच बदल झालेली खडी बोली हीच आहे.
उत्तरेतली हिंदी हि खडी बोली आणि आपली ती हिंदी असं नाहीये,
खडी बोली हि इंडो आर्य कुळातली एक भाषा आहे जी इंडो आर्य कुळाच्या मध्य शाखेत येते;
मराठी दक्षिण शाखेत, गुजराती, राजस्थानी पश्चिम; गढवाळी, कुमावनी पहाडी शाखेत; तर भोजपुरी , बंगाली, असामी इत्यादी पूर्व गटात येतात,
खडी बोली ह्या मूळ दिल्ली, मेरठ परिसरातील देशी भाषेवर फारशी प्रभाव होऊन उर्दू जन्माला आली. तिच्यात पुढे इतर भाषांचे शब्द येत गेले आणि तिला हिंदुस्तानी म्हणलं जाऊ लागलं (फारशी अक्षरांत लिहिलेली भाषा) ,
पुढे इस १९०० नंतर उत्तरेतील काही लोकांनी आपली मातृभाषा असलेल्या ब्रज, अवधी, भोजपुरी, राजस्थानी सोडून हिंदुस्तानी लाच पुढे आणलं, तिच्यात फारशी शब्दांऐवजी संस्कृत शब्द घालून (खरतर घुसवून) तिला हिंदी असं नाव दिलं, खडी बोलीचं हे रूप कोणत्याही माणसाची मातृभाषा नाही, पण उत्तरेतील धार्मिक तणावाच्या वातावरणामुळे हे रूप मोठ्या प्रमाणवर स्वीकारलं गेलं, खरतर हिंदुस्तानच्या (उत्तर भारताच्या) सगळ्याच भाषा ह्या हिंदी आहेत  पण संस्कृत शब्द घातलेल्या खडी बोली भाषेला हिंदी असंनाव देऊन भाषिक राष्ट्रीयत्व निर्माण करायचा प्रयत्न केला गेला, पण घटनेतील समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्य ह्या तीन मुलभूत तत्वांच्या अंगीकारामुळे, हिंदी भाषेच्या दादागिरीमुळे आणि स्वाभिमानी अहिंदी नागरिक विशेषतः तमिळ भाषिकांच्या विरोधामुळे हिंदी=भारत हे भाषिक राष्ट्रीयत्व तेवढ्यापुरतं टाळलं गेलं.
पण ह्या अतिरेकाची मुळंअजूनही जिवंत आहेत आणि राष्ट्रभाषा, राजभाषा, संपर्कभाषा इत्यादी गोंडस नावं वापरून भारत = हिंदी हा समाज पसरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो.

संदर्भ -
१.
 https://en.wikipedia.org/wiki/Indo-Aryan_languages#Classification
२. https://amrutmanthan.wordpress.com/2010/08/15/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87/
 1